महामार्ग बांधणी होतानाच अनेक निष्पाप नागरिकांचे बळी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, May 22, 2022

महामार्ग बांधणी होतानाच अनेक निष्पाप नागरिकांचे बळी

महामार्ग बांधणी होतानाच अनेक निष्पाप नागरिकांचे बळी 

 या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. पती-पत्नी दोन लहान मुले आणि मेहुणा

             मोहोळ(कटूसत्य वृत्त):- सध्या सुरू असलेले मोहोळ पंढरपूर आळंदी महामार्गाच्या कामामध्ये सुसूत्रता आणि शिस्त काहीच जाणवत नाही. स्थानिक गाव पुढार्‍यांनी आपापली वाहने, मशीन विकत घेऊन महामार्गासाठी भाड्याने लावले आहेत. तर कोणी आपल्या नातेवाईकांना या मार्गामध्ये तात्पुरत्या स्वरूपातील नोकरी लावली आहे. सर तालुक्यातील अनेक अधिकाऱ्यांना ट्रीपला जाण्यासाठी याच महामार्गाच्या पोट ठेकेदारांची खाजगी वाहने मोफत डिझेल भरून पाठवली जातात. त्यामुळे या महामार्गाच्या बांधणीत जे काही गैरप्रकार चालतात त्याबाबत कोणीही आवाज उठवायला तयार होत नाही.. तालुक्यातील ही मिंधेगिरी आणखी किती दिवस चालणार आहे हे कळायला मार्ग नाही.

             आज झालेला अपघातानंतर कोणीही अपघातस्थळी मदतीला आले नसल्याचे सांगितले. विशेष बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर तब्बल ५२ मिनिटानंतर पोलीस आणि आरोग्य विभाग त्या ठिकाणी पोहोचला.. शिवाय हा महामार्ग नेमका किती पदरी आहे ? हे काही कळायला मार्ग नाही. कुठून पण कुठेही वाहतूक वळविण्यात आली आहे. या महामार्गावर आणखी महिनाभरात अपघात घडले तर जवळपास शंभर जणांचे बळी गेलेले असतील. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी होणारा हा महामार्ग बांधणी होतानाच अनेक निष्पाप नागरिकांचे बळी घेऊन पूर्ण होत आहे..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages