Hot Posts

6/recent/ticker-posts

शंकरनगर ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्यांचा मदनसिंहांच्या हस्ते सन्मान

 शंकरनगर ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्यांचा मदनसिंहांच्या हस्ते सन्मान

    अकलुज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत मानाचा समजला जाणारा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार  शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्राला नुकताच प्राप्त झाला.त्या पार्श्वभुमीवर प्रजासत्ताक दिनाचे औचीत्य साधत प्राथ.अरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांचा शंकरनगर ग्रामपंचायतीच्या वतीने मदनसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते यथोचीत सन्मान करुन  गौरविण्यात आले. 


स्वच्छता,रुग्णसेवा,परीसर स्वच्छता,प्रसुती व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया इत्यादींच्या गुणवत्तेवर अवलंबुन असलेल्या कायाकल्प योजनेत तालुका आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली प्राथ.आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी.अमोल आव्हाड व सर्व कर्मचार्यांनी काम करत राज्यात सर्वाधिक गुण(98.10%) मिळवून प्रथम क्रमांक व दोन लाख रुपये चे बक्षिस  प्राप्त केले.

या पुरस्कार अंतर्गत प्रामुख्याने, स्वच्छता, रुग्णांना मिळणारी सेवा, आजारावरील उपचार, रुग्णालयाची निगा व परिसर स्वच्छता, वेगवेगळ्या योजनेतून रुग्णांना मिळणारे लाभ, प्रसूती, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया,  इत्यादी निकषावर सदरचा पुरस्कार दिला जातो.

  यापूर्वी ही शंकरनगर केंद्राला  2016-17 मध्ये जिल्हास्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार मिळालेला आहे. तसेच 2017-18 व 2007-08 मध्ये महिला व बालकाच्या आरोग्य विषयक कार्यामध्ये आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कारही  मिळालेला आहे.

कोवीड काळात आरोग्य कर्मचार्यांनी जिवाचि पर्व नकरता केले ऊल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना आणखी ऊर्जा मिळुन रुग्णसेवा घडावी हा ऊद्देश डोळ्यासमोर ठेवुन शंकरनगर ग्रामपंचायतीने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करुनसदर सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.

यावेळी आरोग्य केंदाचे वैद्यकीय अधिकारी अमोल अव्हाड,आरोग्य सेवक एस.एम.नाईकवडी,अर्जुन रुपनवर,विलास झुरळे,महादेव दडस,मोहन नेरकर,तुषार तारु,शेख,कर्चे,आरोग्य सेविका अयोध्या भुसारे,एस.व्ही.मोरे,सौ.सुर्यगण यांचेसह सुमारे ८३  आरोग्य कर्मचारी,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,मदतनीस,शिक्षक आणि ग्रामपंचायत कर्मचार्यांचा सन्मान अकलुज कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी तलाठी नवनाथ मोरे,उपसरपंच सुनिता एकतपुरे,माजी उपसरपंच जयवंत माने-देशमुख,सदस्या विद्या शेखर,सारीका भोसले,मोनाली यादव,सिमा लोखंडे,बुवाजी निकम,सदस्य गजानन पिसे,प्रविण गोडसे ,गुंड गुरुजी,मुख्याध्यापक खडतरे,क्षिरसागर आदी ऊपस्थित होते.

यावेळी यशवंतनगर केंद्र प्रमुख विठ्ठल नष्टे यांनी आपल्या आखीव रेखीव सुत्रसंचलनाच्या माध्यमातुन  संपुर्ण कार्यकामाचा लेखाजोखा ऊपस्थितांसमोर मांडला तर आभार ग्रामसेवाक विजय नवले यांनी मानले. 


अद्याप कोरोना संपलेला नाही.नागरीकांनी लसीकरण करुन कुटुंब आणि समाजातुन कोरोना हद्दपार करावा.त्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करण्याची गरज आहे.लसीकरणाविषयी गैरसमज मनातुन काढावेत.सध्या सायन्सच्या आधारे मानवाने खुप प्रगती केली आहे.त्याचा ऊपयोग करीत नागरीकांनी जीवन सुखकर करावे.

-मदनसिंह मोहिते-पाटील ,सभापती,कृ.ऊ.बा.समिती अकलुज 


यशासाठी वेळेचा सदउपयोग करणे गरजेचे असते.प्रत्येकाने ध्येय निश्चित करावे.ध्येय निश्चित नसेल तर मनुष्याची अवस्था भरकटलेल्या जहाजासारखी असते.ग्रामपंचायतीने केलेल्या सन्मानामुळे कामासाठी आणखी ऊर्जा मिळाली.त्या ऊर्जेचा सद्पयोग  कोरोना हद्दपार करण्यासाठी अवश्य करणार.

अमोल अव्हाड,वैद्यकीय अधिकारी

Reactions

Post a Comment

0 Comments