बँकींग नियमन कायद्यातील सुधारणांमुळे सहकारी बॅंकांवर होणाऱ्या परिणामासंदर्भात मा.उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करणार – समितीचा निर्णय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

बँकींग नियमन कायद्यातील सुधारणांमुळे सहकारी बॅंकांवर होणाऱ्या परिणामासंदर्भात मा.उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करणार – समितीचा निर्णय

बँकींग नियमन कायद्यातील सुधारणांमुळे सहकारी बॅंकांवर होणाऱ्या परिणामासंदर्भात मा.उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करणार – समितीचा निर्णय

मुंबई, (कटूसत्यवृत्त)बँकींग रेग्युलेशन ॲक्ट१९४९ मध्ये केंद्र शासनाकडील अधिसूचना दि२९सप्टेंबर २०२० नुसार करण्यात आलेल्या सुधारणा सहकारी बँकांना लागू करण्यात आल्या आहेतया बँकींग नियमन कायद्याच्या सुधारणांचा सहकारी बॅंकांवर होणारा परिणाम यासंदर्भात मा.उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करण्यात यावी असा निर्णय गठीत केलेल्या समितीने घेतला आहे,अशी माहिती सहकार  पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

बँकींग नियमन अधिनियम,1949 मध्ये सन 2020 मध्ये केलेल्या सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी गठीत केलेल्या समितीची दुसरी बैठक आज सह्याद्री अतिथीगृहयेथे संपन्न झाली.

या बैठकीला मामहाधिवक्ता आशुतोष कुंभकोणीमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातअन्न  औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणेग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफपाणीपुरवठा  स्वच्छता मंत्रीगुलाबराव पाटीलरोजगार हमीफलोत्पादन मंत्री संदिपान भुमरेसहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमारसहकार आयुक्त तथा समितीचे सदस्य सचिव अनिल कवडेमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि.मुंबई प्रशासक विद्याधर अनास्करविश्वास नागरी सहकारी बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूरविधी  न्याय विभागाचे सचिव संजय देशमुख संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या वतीनेमहाराष्ट्र नागरी सहकारी बँकांचे फेडरेशन लिमुंबई हे बँकींग नियमन अधिनियम१९४९ मधील सुधारणांना आव्हान देण्यासाठी मा.उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करतील.

दि. एप्रिल २०२१ पासून सदर अधिनियमातील बदल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना लागू झालेले असल्यामुळे त्यांची संघीय संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमुंबई बँकींग नियमन अधिनियम१९४९ मधील सुधारणांना आव्हान देण्यासाठी मा.उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करेलतसेच या बँकींग अधिनियमातील बदलांमुळे राज्य शासनाचे काही अधिकार अधिक्रमित होत असल्याने याबाबत योग्य ते कायदेशीर पाऊल राज्य शासनामार्फतही तातडीने उचलण्यात येईल असेही श्रीपाटील यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages