साखर उद्योग वाचविण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

अकलूज(विलास गायकवाड) दि.८(क.वृ.): गेल्या चार पाच वर्षापासून राज्यातील साखर उद्योग अडचणीत आहे. या उद्योगाला वाचविण्यासाठी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या उद्योगाशी संबंधीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून हा उद्योग वाचविण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली.
५ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्रीगटाचे प्रमुख अमित शहा व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर आ मोहिते पाटील यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान व केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली . त्यांच्या समवेत दौंड विधानसभा क्षेत्राचे आ राहूल कुल हे होते.
सध्या जागतीक बाजारपेठेत साखरेला दर नाही. ३१०० ते ३११० या दरम्यान साखरेचे दर आहेत. तर शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या एफ आर पी प्रमाणे दर द्यावा लागतो. उस खरेदी , तोडणी वाहतूक , कामगार पगार व बॅंक कर्ज या सगळ्यांचा मेळ घालताना राज्यातील सहकारी साखर कारखानदारांना तारेवरची कसरत करावी लागते. केंद्र शासनाने १ ऑक्टोबर पासून उसाला २८५० रुपये एफ आर पी देण्याचा निर्णय घेतला आहे तर साखरेच्या चालू दरात २०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी एफ आर पी ची रक्कम वाढली परंतु साखरेला १ ऑक्टोबर पासून २०० रुपये प्रतिक्विंटल वाढणारा दर मात्र जैसे थे आहे . तो वाढवून मिळावा अशी मागणी आ मोहिते पाटील यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली.
0 Comments