३१ मार्चपर्यंत देशातील सर्व रेल्वे गाड्या रद्द - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, March 22, 2020

३१ मार्चपर्यंत देशातील सर्व रेल्वे गाड्या रद्द

३१ मार्चपर्यंत देशातील सर्व रेल्वे गाड्या रद्द



मुंबई - कोरोना या विषाणूच्या संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत देशातील सर्व रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.आगामी २४०० तास रेल्वे वाहतूक बंद करीत प्रवाशांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे.
सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरले आहे. आता पर्यंत या प्राणघातक विषाणूपासून अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, या विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी देशाचे पंतप्रधान 'नरेंद्र मोदी' यांनी आज जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. आज सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनतेने घरातच राहण्याचं मोदींनी सांगितलं आहे.
तसेच , करोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी मुंबईतील लोकलसेवा दि. 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा धाडसी निर्णय शासनाने घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईतली लोकल बंद राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages