जे चुका करतात त्यांना इंदोरीकर महाराज चांगलेच झोंबतात...
*ह.भ.प. इंदोरीकर* महाराज ग्रामीण शैलीत बोलणारे
पस्तीस किलोचे प्रबोधनकार आहेत. इंदुरीकर महाराज चुकलेले नाहीत, जे चुका करतात त्यांना इंदुरीकर महाराज चांगलेच
झोंबतात... ते खरं बोलतात म्हणून बऱ्याच लोकांना झोंबतं. प्रवचन करताना काही लोक
बरं बोलतात परंतु खरं बोलत नाहीत, मात्र इंदुरीकर महाराज ग्रामीण वास्तव मांडत
असल्यामुळे 'खरं बोलतात. लक्षात ठेवा, इंदुरीकर भोंदू-लबाड महाराज नाहीत. इंदुरीकर
महाराजांनी पुराणातील सम-विषम तारखेचा संदर्भ देत असताना चूक केली. परंतु ते
आजपर्यंत कधीही चुकलेले नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. पुरानात किंवा ज्ञानेश्वरीत
आपल्याला याचा उल्लेख आढळतो. वेळ पडली तर ज्ञानेश्वरी बदलावी लागेल का पहिला
पाहिजे. *ज्याला मुलंच होत नाहीत, त्याला सम-विषम तारखेचा फायदा काय...* यावर सुद्धा
स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे. कारण आम्ही विद्रोही तुकाराम समर्थक आहोत. *सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही
बहुमता...!* *सामाजिक प्रबोधन* करताना घरावर तुळशीपत्र ठेवून 24 तास महाराष्ट्र पालथा घालणे हे तोंडाच्या गप्पा
नाहीत. प्रबोधन चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक थोरामोठ्यांना याचा अनुभव जास्त
आहे. ग्रामीण व साधी भाषाच लोकांना व्यवस्थित कळते...! गावगाड्यात जाऊन लोक जमवून, त्यांना त्यांच्या भाषेत उदाहरणासह स्पष्टीकरण देऊन
समजावून सांगत... हजारोंच्या संख्येने सभा व्याख्यान, सभा अथवा गाथा पारायणाचे कार्यक्रम घेणे, माणसाला हसवत ठेवणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत गाडगे महाराज यांची संतवाणी ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यंत
अभंगाद्वारे समाज प्रबोधन करणे, सत्य इतिहास सांगणे, गाव गाड्यावरील माहिती देत संस्कृती, मोठेपणा, बडेजाव, चालीरीती व अल्लडपणा हे सर्व इंदोरीकर महाराज
विनोदातून प्रबोधन करून सांगतात, हा त्यांचा हातखंडा आहे. कदाचित ते चुकले असतील परंतु
वाईट नाहीत. त्यांनी *महिलांचा सन्मान केलाच पाहिजे, हीच आपली गण संस्कृती आहे.* *व्याख्याने देणारे वक्ते,* प्रवचन सांगणारे महाराज, भाषण करणारे नेते आणि साहित्य अथवा पुस्तक निर्णय
लिहिणारे लेखक व साहित्यिक यांनी चांगल्या माणसासाठी बोललो पाहिजे. बरेच जण
दुकानदार आहेत, हे सगळे काचाच्या घरात राहतात. आयुष्यात एक चूक माफ
असते. मात्र तिला जर संदर्भ असेल तर ती चुक पोटात घेतली पाहिजे, असे मला वाटतं. प्राचीन पुराणात, आयुर्वेदात सम-विषम तारखे चा उल्लेख आढळतो. संभोग
करताना सम विषम तारखेच्या गप्पा मारल्या जातात. स्त्रीचा अपमान कोणीही करू नये.
परंतु *पुरातन काळामध्ये कॅलेंडर उपलब्ध नव्हतं तर त्याकाळी तारखेला जन्म घालणारा
बाप कोण...?* याचाही शोध घेतला पाहिजे. *प्रत्येक आईने* आपल्या मुलीकडे लक्ष दिले पाहिजे, बापाने मुलांवर संस्कार व संसार या कडे लक्ष दिले
पाहिजे. लाखो रुपयांचे लग्न लावण्यापेक्षा छोट्या पद्धतीने लग्न करून गरिबाला मदत
केली पाहिजे, चालीरीती, वाईट परंपरा, अंधश्रद्धा ह्या टाळल्या पाहिजेत. हे सर्व
शेतकऱ्यांना साध्या-सरळ व ग्रामीण भाषेत ह.भ.प. इंदोरीकर महाराज सांगत असतात.
विनोदातून प्रबोधन करणे ही त्यांची सवय असल्यामुळे ते लोकप्रिय आहेत. लाखो लोक
त्यांचे फॕन आहेत. इंदुरीकर यांचा लोकसंपर्क व लोकप्रियता पाहून बऱ्याच लोकांचा पोटशूळ
उठलेला आहे. कदाचित त्यांचे प्रतिस्पर्धी व धर्माच्या ठेकेदारांना त्यांचा प्रचंड
धक्का आहे. हभप. इंदोरीकर महाराजांचा सामाजिक
प्रबोधनाचा मी समर्थक असल्याने *मला त्यांचा अभिमानच वाटतो.* *ह.भ.प. इंदोरीकर* महाराजांना विरोध करणारे बुवा, बापू, कापू यांचे समर्थक आहेत. रोज एका महाराजाच्या
भामट्याच्या किंवा बुवाच्या चरणापाशी बसून आशीर्वाद घेतात. *आसाराम, राम-रहीम* सारख्या स्वयंघोषित बलात्कारी भामट्यांनी
धर्म आणि अध्यात्माला काळिमा पासून भोंदूगिरी केली. लोकांना फसवलं, स्त्रियांवर बलात्कार केले. त्यांच्या विरोधात मात्र
कुठलाही दीड दमडीचा व्यक्ती उठला नाही, हे दुर्दैवी आहे. *महाराष्ट्रात दररोज गांधीची हत्या
करणाऱ्या व नथुराम गोडसे समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षे नाटकं होतात, त्याला विरोध करताना कुठलाही नाटकी-खंडणीखोर दिसत
नाही. चारुदत्त आफळे नावाचा बामटा दररोज खोटा व चुकीचा इतिहास सांगून 'रामदास' मांडतो त्यावेळेस त्याला विरोध करताना कोणीही दिसत
नाही किंवा आंबा खाऊन पोरं होतात म्हणणाऱ्या मनोहर भिडे ला विरोध करताना एकही
व्यक्ती दिसला नाही.* याचा अर्थ हे सगळे भाडेतत्त्वावर करणारे दलाल समाजामध्ये
दुही पसरवत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती भिड्यांच्या आंब्याच्या वेळेस कुठल्या कोपऱ्यात बसली होती हा सुद्धा संशोधनाचा विषय
आहे. म्हणून इंदुरीकर चुकीचे बोलले असतील परंतु ते वाईट नाहीत, हे तितकंच सत्य आहे. *आपली स्त्री संस्कृती जपली
पाहिजे.* *सूर्य तपस्वी आहे.* सूर्यावर थुंकतात येत नाही. त्याच
प्रमाणे हभप. इंदोरीकर महाराज हे सूर्य आहेत. प्रसिद्धीच्या ओघात सूर्यावर थुंकणे
याचा कोणीही प्रयत्न करू नये, वापस आपल्यावरच येते. कारण तेजस्वी प्रकाशाला
अंधाराची भीती नसते. विज्ञान युगात आपण जुन्या काही गोष्टी सोडल्या पाहिजेत.
खोट्या पंचांग, पोथी पुराण यांना आता मूठमाती देऊन
विज्ञान-तंत्रज्ञान व प्रयत्नांवर विश्वास ठेवून आयुष्य जगले पाहिजे. आणि
*आयुष्यात एकदा जगद्गुरु संत तुकाराम महाराज व त्यांची 'तुकाराम गाथा' समजून घेतली पाहिजे... 'या तच सौख्य सामावले आहे...'*प्रबोधन हे गोड विष आहे...! ते सहजासहजी कुणालाही पचत
नाही... ढोंगीपणा करणाऱ्यांना तर अजिबात नाही. नाठाळाच्या माथी हाणू काठी...!- संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे. (हे माझे वयक्तीक मत आहे.)
0 Comments