राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समतेचे कार्य केले- प्रा. रमेश चव्हाण
अनगर (कटूसत्य वृत्त):- राजर्षी शाहू महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर दिन दलित,उपेक्षित, शोषित समाजा समाजाच्या न्याय हक्कासाठी कार्य केले व त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले म्हणून राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकांचे राजे होते असे मत प्राध्यापक रमेश चव्हाण यांनी मांडले.
येथील पाटील विद्यालयात सामाजिक न्याय दिन आणि कवी कालिदास दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत ढोले हे होते तर, उपप्राचार्य महादेव चोपडे, पर्यवेक्षक माधव खरात, तसेच राजेंद्र डोके यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात कवी कालिदास यांच्या जीवन व साहित्यावर राजेंद्र डोके यांनी प्रकाश टाकला.
कालिदास यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी कालिदास यांचे संस्कृत वाङ्मयातील योगदान आणि त्यांच्या रचनांमधील संस्कृतीचे दर्शन विषद केले.
या वेळी प्राध्यापक रमेश चव्हाण यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर भाष्य केले. त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्याचा आढावा घेत, त्यांच्या माध्यमातून समाजात कसे परिवर्तन घडून आले याचे विवेचन केले.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेचे मूल्य आणि साहित्यिक वारशाबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी हनुमंत गुंड यांनी सूत्रसंचालन केले तर माधव खरात यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी बब्रुवान बोडके, परमेश्वर थिटे, गोरख गायकवाड, दाजी गुंड, विलास गुंड, सत्यवान कांबळे, पांडुरंग शिंदे,सत्यवान दाढे सोमनाथ ढोले, उज्वला घोलप, अनुराधा गोडसे,अनुपमा वरवडकर आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments