Hot Posts

6/recent/ticker-posts

स्थिर सरकारसाठी सेवाभावी महायुतीला विजयी करा

 

स्थिर सरकारसाठी सेवाभावी महायुतीला विजयी करा

 

सोलापूरच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन





  मुंबई ( कटूसत्य वृत्त ):-  विकासाचे ध्येय असलेले स्थिर सरकारच महाराष्ट्राकरिता दूरगामी नीती राबवू शकते. काँग्रेस आणि त्यांच्या महाआघाडीच्या गाडीला चाके नाहीतब्रेक नाहीतगाडी कोणी चालवायची यासाठी भांडणे सुरू आहेत. निवडणुकीआधीच मुख्यमंत्रीपदासाठी एकमेकांशी भांडणारे अस्थिर लोक स्थिर सरकार देऊ शकत नाहीतराज्याचा विकास करू शकत नाहीतत्यामुळे स्वच्छ नीती आणि सेवाभावाचे संस्कार असलेल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला साथ द्याअसे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर येथे जिल्ह्यातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या विशाल जाहीर सभेत बोलताना केले. खा. धनंजय महाडिकज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णीआणि उमेदवार सुभाष देशमुखविजय देशमुखदेवेंद्र कोठेसचिन कल्याणशेट्टीसमाधान आवताडेराम सातपुते, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे आदी उपस्थित होते.
सर्वाधिक वेळा सोलापुरात आलेला बहुधा मी पहिलाच पंतप्रधान असेनअसे प्रतिपादन करून केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने देशात व राज्यात राबविलेल्या अनेक यशस्वी योजनांचा आढावा घेताना मोदी यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली. समस्या कायम ठेवून लोकांना त्यामध्ये गुरफटवून ठेवणे ही काँग्रेसची नीती असून यामुळे त्यांनी जनतेला अनेक दशके हलाखीचा अनुभव दिला. यामुळेच शेतकरीमाताभगीनी त्यांना कधीही माफ करणार नाहीत असे ते म्हणाले. महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केलेआता प्रत्येक शेतात सौर ऊर्जा पोहोचविण्यासाठी आम्ही झटत आहोत. प्रत्येक शेतीपंप सौरऊर्जेवर चालणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणाऱ्या अनेक योजना आम्ही देशात राबविल्या आहेत. ऊसाची आधारभूत किंमत निश्चित केलीइथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिलेअसे ते म्हणाले. इथेनॉल तंत्रज्ञान अगोदरपासूनच होतेपण अगोदरच्या सरकारांना शेतकऱ्यांना तडफडत ठेवण्यातच मजा वाटत होतीअसा आरोप मोदी यांनी केला.
महाराष्ट्राची श्रद्धास्थाने आणि संस्कृतीचा सन्मान करणारे महायुतीचे सरकार असतेतेव्हा विकासाची कामे कशा वेगाने होतातयाचा सोलापूरकरांनी अनुभव घेतला आहे. गेल्या अनेक दशकांपासून टांगणीवर असलेले अनेक विकास प्रकल्प महायुती सरकारने पूर्ण करून दाखविले आहेत. या विकासकामांमुळे दळणवळणाच्या सुविधा सुलभ झाल्या असून प्रवासीभाविकयात्रेकरूंचे हाल संपुष्टात आणण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले आहे. शहराच्या चारही बाजूंना चारपदरी महामार्ग झालेशहरातून वंदे भारत ट्रेन धावते. काही दिवसांपूर्वी सोलापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण केले. हे सगळे केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारमुळेच शक्य झाले आहे. विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र हे समीकरण आहे. माझी लाडकी बहीण योजना हे राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी असलेल्या महायुती सरकारच्या कटिबद्धतेचे उत्तम उदाहरण आहेपण यामुळेच महाआघाडीत अस्वस्थता पसरली. माताभगिनींना हे पैसे मिळू नयेतयासाठी ते कोर्टापर्यंत गेले. पण जेव्हा महिलांच्या हाती पैसा असतोतेव्हा अर्थव्यवस्थेलाही ताकद मिळते. महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच आमच्या सर्व योजना राबविल्या जात आहेत. तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचा आमचा संकल्प आहेअशी ग्वाहीदेखील पंतप्रधानांनी दिली. 
काँग्रेस आणि त्यांचे साथीदार ओबीसीआदिवासीदलितांमध्ये फूट पाडून संघटित समाजात संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न करत असून त्या धोकादायक खेळापासून सावध रहाएकत्र असू तरच सुरक्षित राहू असेही ते म्हणाले. ‘सबका साथ सबका विकास’ हा भाजप-महायुती सरकारचा मंत्र आहेगरीबांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो. महाराष्ट्रात महायुती सरकार याच योजना पुढे राबवून महाराष्ट्रालाशेतकऱ्यांना समृद्ध बनवेलअशी ग्वाहीही मोदी यांनी दिली.
गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाचा वेग जनतेने अनुभवला आहेआणि प्रत्येक विकास योजनेत खोडा घालणाऱ्या महाविकास आघाडीचा कारभारही जनतेने अनुभवला आहेअसे सांगून मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. महायुतीचे सरकार वेगवान काम करतेआणि महाविकास आघाडीवाले त्यामध्ये अडथळे आणतात. महाराष्ट्राचा एवढा वेगवान विकास ही आघाडीवाल्यांच्या आवाक्यातील बाब नाहीत्यांनी केवळ कामे लटकावणेअडकविणे आणि भरकटविणे यांत नैपुण्य मिळविले आहेअशा शब्दांत त्यांनी काँग्रेस व महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली. त्यांना पुन्हा महाराष्ट्र लुटण्याचा परवाना देऊ नकाअसे आवाहनही त्यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments