Hot Posts

6/recent/ticker-posts

पेच वाढला संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली

पेच वाढला संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली

                मुंबई, (नासिकेत पानसरे):- माजी खासदार संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय अगोदरच जाहिर केला आहे. राज्यात शिवसेना भाजपा संघर्ष शमता शमत नाही.अशा परीस्थितीत महाविकास आघाडी मधील घटक पक्ष राष्ट्रवादी कॉग्रेसने संभाजीराजेंना पाठिंबा दिला आहे.त्यातच शिवसेना राज्यसभेची सहावी जागा लढणार असल्याचे अनिल परब यांनी जाहीर केले. त्यामुळे संभाजीराजे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

                संभाजीराजे यांनी यापुढे माझा कोणत्याही पक्षाशी संबंध असणार नाही. तसेच राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी कॉग्रेसने पाठींबा जाहीर केला. त्यामुळे मित्र पक्षांना विश्वासात न घेता पाठींबा दिल्याचे सांगत काँग्रेस आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. तर शिवसेनेने सहावी जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तर या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने खासदार संभाजीराजे यांना शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर नाकारत मी अपक्षच निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे.

मतांचे गणित-

                ३१ मे रोजी राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. तर १० जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी राज्यात सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे.आमदारांच्या एकूण संख्याबळानुसार भाजप २, शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष प्रत्येकी एक जागा मिळवू शकते. मात्र राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता चुरस वाढली आहे. या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र या जागेवर शिवसेना उमेदवार देणार आहे. त्यामुळे संभाजी राजे यांच्यासमोरीत पेच वाढला आहे.

                भापजकडे मित्रपक्षांसह ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीकडे  १६९ आमदार आहेत.त्यामध्ये शिवसेना ५५,राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेसकडे ४४ आमदार आहे.तर इतर पक्ष आणि ८ अपक्षांचे महाविकास आघडीला समर्थन आहे.

                राज्यसभेचा खासदार होण्यासाठी मतांच्या कोट्याचे सुत्र ठरवण्यात आले आहे. त्यानुसार राज्याची एकूण विधानसभा सदस्यसंख्या भागिले राज्यसभेच्या रिक्त जागा + १ यानुसार कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येणार हे ठरत असते.

                राज्यात २८८ आमदार, राज्यसभेच्या ६ रिक्त जागा + १ म्हणजेच २८८÷६ = ४१.१४ +१= ४२.१४ म्हणजे एका जागेसाठी ४२ मतांची आवश्यकता आहे.त्यामुळे भाजप आपल्या संख्याबळामध्ये दोन खासदार निवडून आणू शकतो. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी १ खासदार निवडून आणू शकतात. सहाव्या जागेसाठी ४२ मतांची आवश्यकता आहे.मात्र भाजपकडे २२ तर शिवसेना आणि मित्रपक्ष मिळून ३३ मतं अतिरिक्त आहेत.त्यामुळे सहाव्या जागेसाठी पेच वाढला आहे. त्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे शिवसेना सहाव्या जागेसाठी ताकद लावताना दिसत आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे यांनी सर्व आमदारांना पत्र लिहून पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सहावी जागा कोणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments