अधिकार्याच्या गावात शेतकर्याची कमालउपळाई(बुद्रुक) गावच्या शेतकर्याच्या डाळिंबाची गोडी केरळकरांना आवडली

२५ गुठ्यांत काढले सेंद्रीय खतांचा वापर करुन १४ लाखांचे उत्पन्न,भारत जाधव यांची किमया

माढा (कटूसत्य वृत्त):-शेती म्ह्टलं की अनेक जण नकारार्थी शब्द पुटपुटतात.योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाच्या जोरावर शेती केल्यास यशस्वी ठरते. केवळ २५ गुंठे क्षेत्रात चक्क १४ लाख १० हजाराचे उत्पन्न मिळविण्याची किमया माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील भारत जाधव या शेतकऱ्याने हासील करुन दाखवली आहे.अधिकार्याचं गाव अशी राज्यभरात ख्याती असलेल्या गावात जाधव यांनी कमाल करुन दाखवली आहे.इतके भरघोस उत्पन्न मिळवलेले पाहुन अन्य डाळिंब उत्पादक शेतकरी आवाक झालेत.मात्र ही जाधव यांची वस्तु स्थिती असुन ती नाकारून चालणार नाही. जाधव यांचे डाळिंब केरळ मध्ये पोहचले असुन केरळ वासियांना डाळिंबाची गोडी आवडली आहे. रासायनिक शेतीला बगल देऊन सेंद्रीय पद्धतीने लागवड केलेल्या जाधव यांना २५ गुठ्ठे क्षेत्रात १८ टन माल निघाला असुन १६ टन माल केरळला गेलाय.तर २ टन जिल्ह्याच्या बाजारपेठेत विकला गेला आहे.खत,औषधे,मजुरी यासह अन्य असा २ लाखांचा खर्च झाला आहे.भगव्या डाळिंबाच्या जातीतुन कमी क्षेत्रात भरघोस उत्पन्न मिळवलेले शेतकरी जाधव आता चर्चेत आलेत.त्यांनी केलेली डाळिंब शेती पाहण्यासाठी शेतकरी बहुसंख्येने आवर्जुन येताहेत.जाधव अनेक वर्षे आपल्या शेतात ज्वारी , मका यासह अन्य पारंपरिक पिके घेत होते.भारत यांना शेतीत गुरु भेटला आणि त्यांनी डाळिंब पिकाची नवी वाट धरली.यापुर्वी शंभर टक्के रासायनिक पद्धतीने शेती करणाऱ्या भारत जाधव यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्यास सुरुवात केली.आणि यंदा सेंद्रिय चा वापर डाळिंब लागवडीसाठी केला.कोरोना प्रादुर्भाव आणि त्यातच पडलेले लॉक डाऊन याचा सर्वात मोठा फटका शेतीमालाला बसत आला आहे.काबाडकष्ट करुन शेतात पिकविलेल्या मालाला कवडी मोल भाव मिळत असल्याने माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ बळीराजावर आली आहे.अशा विदारक स्थितीत अवघ्या २२ गुंठे क्षेत्रात जाधव यांनी केलेल्या डाळिंब शेतीतुन त्यांची लाखमोलाची प्रगती झाली. डाळिंबावर पडत असलेल्या तेल्या रोगाने हैराण झालेले शेतकरी डाळिंबाच्या बागा काढत असताना नियोजनबद्ध शेतीच्या जोरावर जमिनीच्या लहानश्या तुकड्यातुनभारत जाधव यांनी कोरोना काळात मिळविलेले उत्पन्न निश्चितच इतर शेतकऱ्यांपुढे आयडाॅल ठरतील असे म्हटले तर काहीच वावगे ठरणार नाही. डाळिंब ८८ रुपये दराने केरळला पोहचला-भारत जाधव यांचे उपळाई च्या शिवारात २७ गुठ्ठे जमिन आहे.त्यातही चारही बाजूने बांध असल्याने केवळ २५ गुठ्ठे क्षेत्रावरच पीक घेता येते.जाधव यांनी २६० डाळिंबाची झाडे लावली होती.

एका झाडाला प्रत्येकी जवळपास ३०० ते ४०० डाळिंब लागली असुन यातुन १८ टन माल निघाला आहे.ज्याला ८८ रुपये प्रति किलो दर दर मिळाल्याने भारत जाधव मालामाल झाले आहेत. मरीसाठी योग्य खताची मात्रा,१५ झाडे दगावली- मरी रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जाधव यानी बुरशी नाशक औषधाचा मात्रा देत विशेष काळजी घेतली. एकुण २७५ झाडा मधुन त्यांची १५ झाडे मरी मुळे दगावली गेलीत.भगव्या डाळिंबाच्या जातीतुन २६० झाडामधुन त्यांना हे उत्पन्न हाती आले आहे. शेतीला नुकसान कारक समजणे हा फार गैरसमज आणी चुक ठरत आहे.योग्य नियोजन,व्यवस्थापन, प्रयत्नाची पराकाष्टा केल्यास काहीच अशक्य नाही.पारंपरिक पिक लागवडीला फाटा देऊन डाळिंब शेतीकडे वळायला हवे. मला तर डाळिंबाने भरपुर आर्थिक समृध्दी मिळवुन दिलीय.मी फार समाधानी आहे-भारत जाधव,शेतकरी उपळाई(बुद्रुक) ता.माढा मी स्वतःह जाधव यांच्या शेतात डाळिंब जाऊन पाहिले.निर्यात क्षम एकुण १६ टन डाळिंब केरळला पाठवले आहे.चांगल्या दर्जाचे चवदार आणि वजनदार डाळिंब होते.म्हणुन ८८ रुपये दराने खरेदी केला- नागेश ठवरे,निमगाव-इंदापुर इक्स पोर्ट व्यापारी २५ गुठ्यांत जाधव यांनी मिळवलेले उत्पन्न शक्य आहे.वेळेवर दिलेली औषध मात्रा, मनात बाळगलेली सकारात्मकता त्या दृष्टीने केलेले प्रयत्न याचे फलित जाधव यांना मिळाले आहे.योग्य नियोजन स्वतःह शेतकर्याने लक्ष घालुन डाळिंब शेती केल्यास प्रत्येक शेतकरी समृध्द होऊ शकतो.-कल्याण शिंदे,डाळिंब तज्ञ तेलगंणवाडी ता.मोहोळ कृषी निष्ठ आदर्श डाळिंब शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी जि.प.सोलापुर
0 Comments