शेतकरी विरोधीत केंद्र सरकारच्या निषेधार्थराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशात प्रचंड इंधन दरवाढ झाली आहे गॅस पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. महागाई भरमसाठ वाढलेली असताना आज परत केंद्र सरकारने सामान्यांना धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. १०.२६.२६ ची किंमती ६०० रुपयांनी वाढली आहे. डिएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डिएपी ११८५ रुपयाला होता, तो आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ चे पन्नास किलोंचे पोते ११७५ रुपयांचे होते ते आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमती वाढविल्या आहेत. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे पाप भाजपच्या केंद्र सरकारने केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या दरवाढीचा निषेध म्हणून याविरोधात राज्यभरात देशाचे नेते शरदचंद्र पवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या आदेशाने प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन हाती घेण्यात आले आहे.त्याच अनुषंगाने पालकमंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे व पक्ष निरिक्षक सुरेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने हे शेतकरी विरोधी केंद सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.या खत दरवाढीचा आम्ही निषेध करतो. शेतकर्यावरची ही अन्यायकारक खताची दरवाढ तात्काळ कमी करावी अन्यथा याहुन तीव्र आंदोलन करण्यात येईल - संतोष पवार कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीअगोदरच इंदन दरवाढ भरमसाठ वाढती महागाईच्या ओझ्याखाली सामान्य माणूस दडलेला असताना खताची दरवाढ करून अजून त्यात भर पडली आहे या दरवाढीमुळे शेतकरी पिचला तर जाईलच परंतु त्यामुळे अजून महागाई वाढेल या दरवाढीचा निषेध - भारत जाधव अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबस करो मोदी सरकार बहुत हो गई महंगाई की मार,पेट्रोल डिझेल गॅस खत दरवाढ कमी झालीच पाहिजे,नही चाहिये हमे मेहेंगे अच्छे दिन लौटा दो हमारे पुराने अच्छे दिन,गांधी लढे थे गोरोसे हम लढेंगे चोरोसे,अरे ह्या केंद्र सरकार चं करायचं काय.. खाली डोकं वर पाय,मोदी सरकार हाय हाय,निषेध असो निषेध असो खत दरवाढ इंधन दरवाढ करणाऱ्या भाजपा केंद्र सरकारचा निषेध असोया घोषणांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद परिसर निनादून सोडला.राज्य शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंध नियमांचे व सोशल डिस्टंसिंग चे पालन करून मास्कचा वापर करत राष्ट्रवादीने हे आंदोलन यशस्वी केले व त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपातमागण्यांचे निवेदन राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.यावेळी भारत जाधव, संतोष पवार, मनोहरपंत सपाटे, जनार्दन कारमपुरी, सुभाष पाटणकर, पद्माकर नाना काळे, राजन जाधव, जुबेर बागवान, सुनीताताई रोटे, आरती हुळ्ळे, चंद्रकांत पवार, वसीम बुराण, जावेद खैरदी, राजू कुरेशी, मिलिंद गोरे, प्रमोद भोसले, गफुर शेख, मोबीन शेख, अनिल उकरंडे, अमीर शेख, तनवीर गुलजार, प्रकाश जाधव, सोमनाथ शिंदे, रुपेश भोसले, अजित पात्रे, प्रवीण साबळे, अनिल बनसोडे, बसू कोळी, संजय पाटील, संजय मोरे, संपन्न दिवाकर, सफल शिरसागर, मुसा आत्तार, मोहम्मद इंडीकर, अमोल कुलकर्णी, संजय सांगळे, जावेद कोतकुंडे, सोपान खांडेकर, सरफराज, बागवान, रमीज मुल्ला, अशितोष नाटकर, ज्योतिबा गुंड, सिद्धेश्वर आंबट, नागेश बोराडे, बाळासाहेब मोरे, प्रमोद भोसले, निशांत साळवे, पद्मश्री शिंदे, ओंकार कांबळे, महेश पवार, सोहेब चौधरी, आनंद कोलारकर, दादाराव रोटे, अनिल उकरंडे, सिया मुलानी, गौराबाई कोरे, मारता ताई, असादे वंदनाताई भिसे, उषा बेसरे व शोभा गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments