फडणवीस सरकार मधील घोटाळे बाहेर काढा - रोहन सुरवसे पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 29, 2021

फडणवीस सरकार मधील घोटाळे बाहेर काढा - रोहन सुरवसे पाटील

 फडणवीस सरकार मधील घोटाळे बाहेर काढा - रोहन सुरवसे पाटील


पुणे (कटूसत्य वृत्त) :- सध्या आम्ही किती धुतल्या तांदळासारखे आहे. असा आव आणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वागताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवरती घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. ठाकरे सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या काळातील भाजपचे मंत्री यांच्यावर झालेले घोटाळ्याचे आरोप बाहेर काढून त्यांची फेर चौकशी करावी. अशी मागणी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी केले आहे.

        माध्यमांशी बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की सध्याच्या सरकारमध्ये एकापाठोपाठ एक प्रकरणे पुढे येत आहेत. धनंजय मुंडे, संजय राठोड, अनिल देशमुख यांच्या प्रकरणाने सर्वसामान्य नागरिकांचे डोके चक्रावून गेले आहेत. कोरोना, गारपीट, अवकाळी पाऊस, यामुळे जनता, शेतकरी बांधव हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा ठोस निर्णय घेण्यात आला नाही. उलट सर्वसामान्य नागरिक शेतकरी बांधव यांच्या माथी लॉक डाउन मधील वीज बिले मारण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोपटा सारखे बोलतात आणि पुढे अचानक शांत होतात. याचा अर्थ सर्वसामान्य जनतेने काय समजायचा? त्यांचे सरकार असताना भाजप नेत्यांची मंत्र्यांची भ्रष्ट कारभाराबाबत  नावे पुढे आले होते. त्यांची ठाकरे सरकारने चौकशी लावावी अशी मागणी सर्वसामान्य जनता आता करू लागली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages