Hot Posts

6/recent/ticker-posts

विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा फुले याच्या स्मृती दिन साजरा

विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा फुले याच्या स्मृती दिन साजरा


सोलापूर (क.वृ.):- समाजातील सर्वच घटकानी महात्मा जोतिबा फुले यांचे विचार आत्मसात केले तर समाज लवकरच सुधरेल अशी आशा विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक गणेश निळ यांनी व्यक्त केली. ते महात्मा जोतिबा फुले याच्या स्मृती दिनानिमित्त विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ, संचालिका सुषमा नीळ, प्रा.प्रविण कोंढारे, प्रा.विश्वनाथ उपाध्य, प्रा.सुवर्णा माने उपस्थीत होते.

पुढे बोलताना निळ म्हणाले की, महात्मा फुले उर्फ तात्या यांचे कार्य विदयेविना मती गेली, मतीविना निती गेले, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले. एवढे अनर्थ एका अविदयेने केले. खर्या अर्थाने शिक्षणाची  गंगा दारोदारि पोहचली व समाज जागृती झाली त्यांच्या सोबतीला सावित्रीबाई फुले यांनी खांदयाला खांदा लावुन काम केले. मुंलींच्या शिक्षणाची दारे खुली केली.  या प्रसंगी संस्थैतील गुणवंत शिक्षक शिक्षिका यांचा संस्थेचा वतीने  गुणवंत शिक्षक म्हणुन सन्मान करन्यात आला  व त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी  संस्थैचा संचालिका सुषमा निळ यांनी ही मनोगत व्यक्तकरुन गुणवंताचे कौतुक करुन शुभैच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविण कोंढारे यांनि केले व आभार सुवर्णा माने यांनी मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments