कोरोनाशी दोन हात करणारा शेतकरी नैसर्गिक आपत्ती समोर हतबल!

तुळजापूर दि.२६(क.वृ.):- तालुक्यात मागील दहा ते बारा दिवसापासून पडत असलेल्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे हाता तोंडाला आलेले खरीप पीक हातुन गेले असुन कोरोनाशी दोन हात करणारा शेतकरी माञ पावासाचा नैसर्गिक आपत्तीमुळे हातबल बनल्याचे झाल्याचे दिसुन येत आहे.
मागील दहाते बारा दिवासापासुन तुळजापूर तालुक्यात सतत उसंती न देता पाऊस बरसत असल्याने काढणीस आलेल्या सोयाबीन पाण्यात गेल्याने यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन शेंगामधून अंकुर बाहेर येत आहेत नुकताच लावण केलेला कांद्याचा पाण्यातच रेंदा होत आहे. जो जगला आहे त्यावर करपा रोग पडला आहे. मुग उडीदाचे ही मोठे नुकसान झाले आहे.
काढणीला आलेले नगदी पीक म्हणून शेतकरी ज्यांच्याकडे पाहतो त्या सोयाबीन व उडीद पिकाच्या उत्पन्नावरच बळीराजाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी करीत असतो मात्र पीक अस्मानी संकटामुळे धोक्यात आले आहे ज्यांचे उडीद व सोयाबीन काढुन टाकले आहे त्यांचे तर प्रचंड नुकसान झाले आहेच पण ज्यांचे पीक अजून शेतात उभे आहे त्या उभ्या पिकात प्रचंड पाणी थांबले असल्याने ते उभारलेल्या अवस्थेत उगवत असल्याने काढनीला आलेले पीक काढायचे कसे असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहिला.
उडीद,सोयाबीन,या बरोबरच तुरीच्या पिकात पाणी थांबल्याने याचा परिणाम तुरीचे पाने पिवळे पडत असून पान गळती सुरु झाली आहे पिका बरोबरच शेतातील माती बांध या पावसात वाहुन गेले आहात. या पावसाचा मोठा फटका बळीराजाला बसला असून त्याचे वर्षभराचे आर्थिक गणितच यामुळे कोलमडून पडले आहे.
0 Comments