बायपास रस्ता काम ठेकेदाराचा मनमनी मुळे शेतकरी ग्रामस्थांचा मुळावर!


तुळजापूर दि.२०(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यातील तडवळा गावा पासुन उस्मानाबाद रस्त्याकडे जाणाऱ्या बायपास मार्ग रस्ता काम करताना ठेकेदाराने नियोजन शुन्य केलेल्या कामाचा फटका शेतकरी ग्रामस्थ व वाहतुक दारांना बसला आहे. या कामाची पहिल्याच झालेल्या मोठ्या पावसात पोलखोल झाल्याने या कामाची गुण नियञक पथका कडून गुणवत्ता चौकशी करुन दोषी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ञस्त शेतकरी ग्रामस्थांन मधुन केली जात आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे वाहनांची गर्दी होवुन कोंडी होवु नये म्हणून सोलापूर नळदुर्ग लातूरहुन येणारे वाहने तिर्थक्षेञ तुळजापूरात गर्दी करु नये थेट उस्मानाबाद ला जाण्यासाठी उस्मानाबाद बायपास रस्ता तयार केला .या अंतर्गत लातूर हुन तुळजापूर कडे येणाऱ्या रस्त्यावर काक्रंबा गावाजवळुन तडवळा मार्ग उस्मानाबाद बायपास कडे जाण्यासाठी बायपास रस्ता करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
बायपास रस्ता कामामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसुन त्याचे मोठे नुकसान झाले असताना प्रशाषणाने ही या मंडळी ना वा-यावर सोडल्यानै लोकप्रतिनाधी तरी आमच्या वर आलेल्या संकटाची दखल घेण्याची मागणी ञस्त शेतकरी ग्रामस्थांन मधुन केली जात आहे.
0 Comments