शासनाकडून नाभिक समाजाला आर्थिक मदत मिळावी - रोहन सुरवसे- पाटील
अकलूज( प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्यातील नाभिक समाजातील प्रत्येक कुटुंबास पाच हजार रुपयाची मदत मिळावी व सलून चालकाचा २५ लाखाचा विमा उतरावा तसेच ग्रामीण भागातील रेडझोन सोडून सलुन दुकान उघडण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे मेलद्वारे केली आहे.
महाभयंकर अशा कोरोना विषाणूचा उद्रेक पाहता आपल्या देशात राज्यात लॉक डाऊन करण्यात आले.हे लॉक डाऊन आम्हा जनतेच्या हितासाठी त्यांच्या जीवासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. लॉक डाऊनच्या परिस्थितीमध्ये नाभिक समाजाचा व्यवसाय शंभर टक्के बंद असून राज्यातील ८०ते ९० टक्के नाभिक समाजाचा उदरनिर्वाह त्यांच्या व्यवसायावर अवलंबून आहे. सध्या नाभिक समाजाचे व्यवसाय बंद असल्यामुळे, नाभिक समाजाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.नाभिक समाजाच्या प्रत्येक कुटुंबास शासनाकडून प्रत्येकी पाच हजार रुपये मदत मिळाली तर त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहचा प्रश्न मार्गी लागू शकेल. तसेच सलून चालकाचा २५ लाखाचा विमा उतरवल्यास भविष्यात गंभीर प्रसंग उद्भवल्यास त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्न मार्गी लागेल तर रेडझोन सोडून ग्रामीण भागातील सलून दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली तर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत होईल.असे पत्रामध्ये नमूद केले असून सदर मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करणेत यावा अशी विनंती स्वाभिमानी ब्रिगेड संघटनचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.
0 Comments