पेनूरचे माजी सरपंच तथा भाजपा नेते रमेश माने यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चातुन पेनुर येथे केला भाजीपाला वाटप
देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर आदी सर्व लोक लाॅकडावुन मुळे घरी बसुन असल्यामुळे दैनंदिन जीवन ठप्प झाले आहे.
याचेच सामाजिक भान ठेवत पेनुरचे माजी सरपंच रमेश माने यांनी गावातील लोकांना रोजच्या जीवनातील जीवनावश्यक भाजीपाला बटाटे, टोमॅटो, कांदे, वांगे, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, कारले, कोबी-फ्लॉवर, लिंबू, आले, डेटाॅल साबन, यासह विविध वस्तूंचे 400 बैग वाटप करण्यात आले.कोरोनाशी लढण्यासाठी या अगोदर ही मास्क व सॅनिटायझर वाटप करून जनतेस स्वताची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे कळकळीचे आवाहन रमेश माने यांनी केले .
यावेळी भाजपा मोहोळ तालुका अध्यक्ष सतिश आप्पा काळे,आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.बुद्धाजी बेले, शिवसेना नेते चरणराज चवरे, उपसरपंच रामदास चवरे, ग्रामपंचायत सदस्य रणजित चवरे, उद्योजक समाधान माने साहेब, बाळु आण्णा गवळी, धनाजी पुजारी, मेंबर सज्जन रंदवे, आण्णासाहेब सलगर, दादाराव गवळी, शंकर रणदिवे ,मनोज गवळी आदी मान्यवरांच्या हस्ते सोशल डिस्टेंसस ठेवत प्राथमिक स्वरुपात वाटप करुन उर्वरीत लोकांना बालाजी गवळी,दशरथ आवारे, भास्कर माने, पिंटु रणदिवे, राजाभाऊ कारंडे, दत्ता गावडे, पोपट सलगर, फंटु माने,अमोल खरात, मानाजी खरात, यासह रमेश माने मित्रपरीवाने घरपोच भाजीपाला वाटप करण्यात आले.





No comments:
Post a Comment