नाशिकच्या जोडप्याचे पैसे चोरीला गाव
कसे गाठायचे आली पंचायत -
दत्ता भोसले धावले मदतीला."
अन्य साहित्त्य चोरीला गेल्यानंतर संचारबंदीच्या काळात गावी जाण्यासाठी पैशासाठी भटकंती
करणाऱ्या त्या जोडप्यासमोर सामाजिक कार्यकर्ते दत्ता भोसले हे जणू दत्त म्हणून उभे राहिले
त्यांनी आपल्यातील माणुसकी दाखवित त्या जोडप्याला सुखरुप त्यांच्या गावी पोहोचविले
नाशिक जिल्हयातील दिंडोरी तालुक्यातील गोपेगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील सुनील
चिंटू पगार हे आपल्या गदोदर पत्नीचा नवस फेडण्यासाठी कोल्हापूर, अक्कलकोट येथे
देवदर्शनाला आले होते त्यावेळी अक्कलकोटमध्ये त्यांचे सर्व साहित्त्य आणि पैसे असलेली बॅग
चोरीला गेली त्या जोडप्याने कसेबसे जवळ होते तेवढया पैशाने सोलापूर गाठले, परंतु पुढचा
प्रवास लांबचा होता. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतभर जनता कपy पुकारला
होता त्यामुळे जाणार कसे हा त्यांच्यासमोरचा प्रश्न होता त्यावेळी हे दोघे सोलापुरातील एसटी
स्टैंड परिसरात प्रत्येक माणसासमोर याचना करुन गावी जायला पैसे मागत होते मात्र, पैसे जमा
होणे तसे अवघड होते वेळ रात्रीची आणि गदोदर पत्नी सोबत असल्याने अन्नपाण्याविना
हिंडणारे सुनील पगारही काहीसे अवघडले होते पत्नीला अशक्तपणा जाणवत होता तेवढयात
त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयातील कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते दत्ता
भोसले हे जणू दत्त म्हणून त्यांच्यासमोर उभे राहिले. त्यांनी या जोडप्याची हकिकत जाणून
घेतली लागलीच त्यांच्यातला सामाजिक कार्यकर्ता जागा झाला आणि त्यांनी पैशाची
जमवाजमव सुरु केली, परंतु एवढेच करुन थांबतील ते दत्ता भोसले कसले, त्यांनी
सकाळपासून उपाशी असलेल्या या जोडप्याच्या पोटापाण्याचीही व्यवस्था केली आणि नाशिकला
जाणाऱ्या एका खासगी वातानुकूलित वाहनातून चक्क या जोडप्याला गावी रवाना केले.
त्यावेळी जाताना या जोडप्याने डोळयातून पाणी आणून दत्ता भोसले यांनी दाखविलेल्या
माणुसकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व त्यांना गावी येण्याचे निमंत्रण दिले. विशेष म्हणजे हे
सारे पाहून नवीवेस येथून एसटी स्टँड जवळील ट्रॅव्हल्सपर्यंत पोहोचवायला का रियाज शेख
नावाच रिक्षावाल्यानेदेखील एक रुपयासुध्दा न घेता तातडीने गाडी निघायच्या आत त्यांना
पोहोचविल्याने हे जोडपे त्यांच्या गावी सुखरुप पोहोचू शकले
याकामी भोसले यांना त्यांचे सहकारी श्रीमंत मुद्दे, रोहन हावळे, प्रा.नागनाथ नवगिरे
तसेच अनिल बाकळे, कल्पना पवा, पोलिस कॉन्स्टेबल शशिकांत खिलारे यांच्याकडून आर्थिक
सहकार्य लाभले या सर्वांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य म्हणून आमदार-शहाजी
(बापू) पाटील, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर-नाना काळे, प्राचार्य डॉ.अनिल
बारबोले, मुख्याध्यापिका सुजाता जुगदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत
आहे.
जाधव दाम्पत्याकडे असलेली संस्थेची मालमत्ता ताब्यात घेणार का?
मराठा समाज सेवा मंडळाच्या मालकीचा असलेला गाळा लता व सुदाम जाधव या
दाम्पत्याने खोटी कागदपत्रे तयार करुन बळकाविला होता. त्यामुळे आता जाधव दाम्पत्याकडे
असलेली संस्थेची मालमत्ता नूतन संचालक मंडळ ताब्यात घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे व सुवर्ण महोत्सवी व त्या निमित्ताने स्मरणिकेचे प्रकाशन कधी होणार याकडेही
सर्वांचे लक्ष लागले आहे व मागील दाराने येणाऱ्या स्विकृत संचालकाची कोणाला संधी
मिळणार हेही पहावे लागणार.
संस्थेचा विकास हेच ध्येय - मनोहर सपाटे.
संस्थेचा विकास हेच आपले ध्येय असून यापुढे ते कायम राहील. गेल्या २५ वर्षातआपण संस्थेचा शैक्षणिक दर्जा कसा वाढविता येईल यासाठीच प्रयत्न केले. यापुढेही आपला हा
प्रयत्न सुरुच राहील. परंतु संस्थेच्या प्रगतीत जर कोणी आडकाठी आणू पाहणार असेल तर
आपण त्याची गय करणार नाही. मग ते आजी-माजी संचालक असोत की शिक्षक अथवा
शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोणालाही माफ केले जाणार नसल्याचे संस्थेचे नूतन अध्यक्ष तथा
माजी महापौर मनोहर सपाटे यांनी सांगितले.
या मराठा समाज सेवा मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुक अधिकारी म्हणून अॅड.आप्पाराव
शिंदे यांनी काम पाहिले आहे.
0 Comments