मुंबईत सर्वाधिक १६२ करोनाबाधित;संपर्कात आलेल्या सर्वांना कॉरेंटाईन करण्यात आलं
मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबईची चिंता वाढवणारी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील ५ हजार जणांना कॉरेंटाईन करण्यात आलं आहे. हे सर्व जण करोनाबाधित रुग्णांच्या जवळून संपर्कात आले होते. मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला भेट दिल्यानंतर राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात मुंबईत सर्वाधिक म्हणजे १६२ करोनाबाधित झाले आहेत. सुदैवाने या संपर्कात आलेल्या सर्वांना कॉरेंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे ते बाहेर फिरुन संसर्ग वाढण्याचा धोका टाळता येणार आहे.
'अजित पवार हेच खऱ्या अर्थानं राज्य चालवताहेत'
राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबईत सध्या एकूण १६२ करोनाबाधित आहेत. राज्यातील करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या ५३४३ एवढी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांचीही चाचणी केली जाणार आहे.'

0 Comments