Hot Posts

6/recent/ticker-posts

मानवता धर्माचे पालन करुन मानव सेवा करणे म्हणजेच इश्वराची सेवा आहे - प आ दत्ता जगतापजी


मानवता धर्माचे पालन करुन मानव सेवा करणे म्हणजेच इश्वराची सेवा आहे - प आ दत्ता जगतापजी 

अकलुज /(प्रतिनिधी) जात,धर्माच्या पलीकडे जावुन मानवता धर्माचा स्विकार करुन अत्मरुपाने एक असलेल्या मानवतेची सेवा करणे हिच इश्वर सेवा असल्याचे वक्तव्य निरंकारी मिशनचे ज्ञानप्रचारक प आ दत्ता जगतापजी यांनी केले.सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुण्यतिथीनिमीत्त आयोजित सत्संग सोहळ्यात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना,सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील पुण्यतिथी समारंभ समीती व संत निरकारी मंडळ शाखा अकलुज यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ४१व्या पुण्यतिथीनिमीत्त येथिल विजय चौकात संत निरंकारी सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्य प्रवचनामध्ये प आ जगतापजी बोलत होते.या सत्संग सोहळ्यास महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघटनेचे उपाध्यक्ष डाँ.धवलसिंह मोहिते-पाटील, पदमजादेवी मोहिते-पाटील,सौ.उर्वशीराजे मोहिते-पाटील, माणिकराव मिसाळ,आण्णासो इनामदार,आण्णा शिंदे, सतिश पालकर,गणेश महाडीक आदी सह हाजारो भाविक उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना प आ दत्ता जगतापजी म्हणाले जनसेवेचा वसा जोपासणाऱ्या सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्याचे नंदनवन तर केलेच पण राज्याच्या विकासात सुध्धि दिपस्तंभाप्रमाणे काम केले.जनसेवा संघटनेच्या माध्यमातून मानवतेचा धर्म जोपासण्याचे काम लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी केले तर आज डाँ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनीही तोच वारसा पुढे सुरु ठेवला आहे. निरंकारी मिशनच्या अध्यात्मिक विचारसणीवर बोलताना ते म्हणाले.माणुस कोणत्याही वर्णाचा व धर्माचा असो परंतु प्रत्येक माणुस हा अत्मरुपाने एका परमात्म्याचा अंश आहे.लोभ, क्रोध,अहंकार अशा गुणामुळे मनुष्य दानव बनला आहे स्त्रियांवरील अत्याचार हा दानवी कृत्याचाचं भाग आहे.ज्याच्याजवळ माणुसकी नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे,मानसात प्रेम,नम्रता,समदृष्टी हे दैवी गुण असणे अवश्यक आहे.आपल्या मुळ स्वरुपाची प्राप्ती करुन घेण्यासाठीच मनुष्य जन्म मिळाला आहे,मनुष्य जन्मातच इश्वर प्राप्ती करुन भक्ती करता येते.निरंकारी मिशनच्या माध्यमातून सदगुरु सुदीक्षाजी महाराज या सत्य परमात्माची जाण करुन मानसा मानसात बंधुत्वाचे नाते जोडण्याचे कार्य करत आहेत आसेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन साळवे गुरुजी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक माने,सुधीर रास्ते,दिलीप कांबळे,नागेश लोंढे,विठ्ठल इंगळे,चंद्रकांत चव्हाण,मयुर माने,राहुल जाधव आदीसह निरंकारी मंडळाचे सेवादल व जनसेवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments