वाढत्या उष्णतेमुळे आंबा तयार;आवक वाढल्याने आता दर कमी आला
.png)
हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे.अवकाळी पावसातून बचावलेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मोहराचा आंबा मार्चपासून बाजारात आला.मात्र,तिसऱ्या टप्प्यात अति डीमुळे परागीकरणाअभावी फळधारणा झालीच नाही. आता चौथ्या टप्प्यातील मोहराचा आंबा तयार होत असून, तो बाजारात येऊ लागला आहे. मात्र, हा आंबा बाजारात येण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.किरकोळ मार्केटमध्येही दर कमी होऊ लागले असून १५ मे पर्यंत आवक भरपूर होणार असून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात आंबा उपलब्ध होईल, असा अंदाज आंबा व्यापारी व्यक्त करीत आहेत.
0 Comments