Hot Posts

6/recent/ticker-posts

कला जतन करणे सर्वांची जबाबदारी : रामपूरे

सोलापूर (प्रतिनिधी)ः कला ही भारतीय संस्कृतीचा एक मोठी देणगी आहे. त्याचा जतण करणे त्याला दुसर्‍यांपर्यंत पोहचविणे ही सर्वांची जबाबदारी आहे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे कारण कलेमुळे माणसांना जगण्याचे बळ मिळते.  विरसा फाऊंडेशनची स्थापना व बोध चिन्हाचे अनावरण कार्यक्रमात अध्यक्ष ज्येष्ठ कलाकार मूर्तीकार भगवान रामपुरे यांनी व्यक्त केले.  निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुंबईचे ज्येष्ठ नाटकार मुजीब खान, कोल्हापूरचे नाट्य लेखक समीक्षक संजय हळदीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष महिबुब तांबोळी यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष फारूक मटके, सचिव अय्युब नल्लामंदू, जाफर बांगी, सुमीत फुलमारी यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. त्यानंतर सय्यद इक्बाल यांनी साकारलेले विरसाचे बोध चिन्हाचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.  प्रमुख वक्ते संजय हळदीकर म्हणाले नाटक हा समाज उपयोगी माध्यम आहे मी गेल्या २५ वर्षांपासून नाटकांचा दिग्दर्शन ही केले व नाटक सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केले आणि आज मी समाधानी आहे. परंतु कलेचे जतन करण्यासाठी विरसा सारखे अनेक संघटनेची गरज आहे.
दुसरे वक्ते मुंबईचे मुजीब खान म्हणाले, नाटकात भाषा आड येत नाही प्रत्येक नाटकाची भाषा वेगळी असली तरी माध्यम याज उपयोगीच आहे. मी भगवान राम व अनेक नाटके केली अनेक अडचणींना गह्या त्या अडचणींना तोंड देत मी नाटके सादर करून कलेला जीवनंत करण्याचा प्रयत्न करीत आहेत व करीत राहीन. अशी ग्वाही दिली. मंचावर सुमीत फुलमाडी, अय्युब नल्लामंदू, महिबुब तांबोळी, फारूख् मटके यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अवेज शेख, वसीम शाबाद, इक्बाल सय्यद, डॉ. इ.जा. तांबोळी, प्रा. डॉ. शफी चोबदार, हय्युम कुरेशी, मुहाफीज सय्यद, जाफर बांगी, मजहर अल्लोळी, समद फुलमाडी इत्यादींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशफाक सातखेड यांनी केले तर आभार मजहर अल्लोळी यांनी मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments