Hot Posts

6/recent/ticker-posts

पोलिसांच्या विविध प्रकारच्या मागणी करिता हालगीनाद आंदोलन

अकलूज (प्रतिनिधी) भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यला अनन्य साधारण महत्व आहे या महाराष्ट्रमध्ये मुंबई आहे व मुंबई हि भारत देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईवर अतीरेकी हल्ले मोठ्या प्रमाणात होतात या हल्यांना प्रतिऊत्तर देण्यासाठी पोलीस आपल्या प्राणाची बाजी लावतात व अतिरेक्यांचे हल्ले व कट मोडीत काढतात. असे हल्ल्यांना तोंड देताना अत्याधुनिक हत्यारे व बुलेटप्रूफ जँकेट असले पाहिजे जेनेकरुन पोलीसांचा बहुमोल जीव वाचवण्यास मदत होईल.  महाराष्ट्र शासनाचे अत्याधुनिक हत्यारे व बुलेटप्रूफ जँकेट व अत्याधुनिक सेवा सुविधा प्राप्त करुन देण्यात याव्यात.  या मागन्याणसाठी क्रान्तिकारी संघर्ष सेनेने अकलूजमध्ये हलगीनाद आंदोलन केले.    महाराष्ट्रत ज्या ज्या ठिकानी पोलीस स्टेशन आहेत त्या त्या ठिकानी पोलीसांना राहण्यासाठी पोलीस वसाहत बांधुन मिळण्यात यावी त्यामुळे पोलिसांना पोलिस स्टेशनला जाण्यासाठी ससेमीरा होणार नाही. या वाढत्या महागाईमध्ये महागाई गगणाला भिडली आहे या महागाईमुळे पोलिस कर्मचा-यांचे जीवन विस्कळीत झाले आहे तरी महाराष्ट्र सरकारने पोलिसांचे वेतन वाढवावे व सातवे वेतन आयोग लागु करण्यात यावे. अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन अकलूज पोलीस यांना देण्यात आले.
    यावेळी क्रांतिकारी संघर्ष सेना (महाराष्ट्र राज्य)  संस्थापक अध्यक्ष  सुधीरभाऊ साठे  यांनी महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपले विचार व्यक्त करीत महाराष्ट्र पोलिसांवर होणारे अन्याय प्रखरपने मांडले.  पोलिसांनी आठ तासाच्यावर काम केले तर त्यांना आोहर टाईम देण्यात यावा. जेल निधी अर्थसंल्पात तरतुद करण्यात यावी केरळ राज्याच्या पोलिस कर्मचा-यांना जेवढे वेतन देतात तेवढे वेतन महाराष्ट्र शासनने द्यावे विविध मागण्यासाठी आपले मतप्रवाह मांडले संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  गणेश भोसले यांनी पोलीसांना दिलेल्या सेवा सुविधा पुरेशा नाहित व त्यामध्ये वाढ करण्यात यावी पोलिसांना अत्याधुनिक सेवा देण्यात आल्या पाहिजे अशी मागणी केली. या मागण्या आमच्या  मान्य नाहि झाल्या तर महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी संघटनेचे  संघटनेचे मार्गदर्शक प्रमोद साठे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष दादासाहेब पोटफोडे, सोलापुर जिल्हा अध्यक्ष शंकर  पवार, इंदापुर तालुका अध्यक्ष सचीन पोटफोडे, माळशिरस तालुका अध्यक्ष दिपक साठे, माळशिरस तालुका सचीव रतन ठोकळे,,माढा तालुका अध्यक्ष मोहन खंडाळे, पवनराजे साठे, अर्जुन कुचेकर, सुनिल खुडे, हरी साठे, अमोल लोखंडे, दादासो वाघमोडे, विलास वाघमोडे, बाळु शिंदे, विलास जाधव, सुरज पालकर, तुकाराम खुडे, संतोष खुडे, मच्छिंद्र वाघमोडे, अंबादास वाघमोडे, पियुश साठे, गोविंद मोहिते, समिर गवळी, आकाश धाईंजे, चेतन पवार, निलेश नलवडे, लक्ष्मन वाघमोडे, साधु वाघमोडे, ऊमेश गवळी आदि ऊपस्थीत होते.
Reactions

Post a Comment

0 Comments